भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या निरीक्षणानुसार मार्चमधील उन्हाच्या झळांची तीव्रता आता राज्यभर जाणवू लागली आहे. शनिवारी कोकण आणि गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली, तर उर्वरित ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्यानजीक पोहोचले आहे. सांताक्रूझ (मुंबई) येथे सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची, तर पुण्यात १४.७ एवढय़ा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.गेल्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ (३७.५), रत्नागिरी (३७.४), पणजी (३६.०), सोलापूर (३६.२), उस्मानाबाद (३५.३), परभणी आणि यवतमाळमध्ये (३५.०), नांदेड (३५.२), अकोला, अमरावती, वाशीममध्ये (३६.२), ब्रह्मपुरी (३६.९), वर्धा (३५.४) या ठिकाणी कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला. अंदाज काय?’सोमवार (१३ मार्च) ते बुधवार (१५ मार्च) या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. ’कोकण आणि गोव्यात तुरळक तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील. ’पुणे आणि आसपासच्या परिसरात मंगळवार ते शुक्रवार-दरम्यान दुपारनंतर आकाश ढगाळ असेल. तसेच विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.