करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक वर्ष त्यांचा 2019-20 चा निकाल लघुसंदेश, दूरध्वनी आणि ऑनलाईन पद्धतीने कळवावा, जेणेकरून विद्यार्थांमध्ये कोणताही संभ्रम होणार नाही व त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्या करणे उपलब्ध साहित्याच्या आधारे सुरू करणे शक्य होईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. स्थानिक लॉकडाउनच्या परिस्थितीनुसार पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर विद्यार्थांना निकालपत्र देण्यासाठीची आवश्यक कार्यवाही शाळा, महाविद्यलयांनी करावी असे देखील सांगण्यात आले आहे.