राज्य शासनानं ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा, अन्यथा १ ऑक्टोबर रोजी होणारा संप अटळ असेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात आंबेडकर यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबेडकर म्हणाले, “१ ऑक्टोबरनंतर ऊसतोड मजूर कामावर जाणार नाहीत. ऊतसोड मजुरांची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, तसेच त्यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी या दोघांचही नुकसान होऊ नये, हे शासनानं पहावं.”

“आम्ही १ तारखेला संप करण्यावर अटळ आहोत. यासंदर्भात लवकरात लवकर आम्ही मेळावाही घेणार आहोत. त्यामुळं शासनानं मेळावा घेण्यासाठी परवानगी देऊ अथवा न देऊ हा मेळावा होणारच. तेव्हाच आमची भूमिकाही जाहीर केली जाईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की, त्यांनी यात लक्ष घालावं आणि ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The chief minister should give justice to the sugarcane workers otherwise the strike is fix says prakash ambedkar aau 85 svk
First published on: 21-09-2020 at 15:31 IST