scorecardresearch

Premium

आदिवासींनी एकत्र येऊन हक्कासाठी लढावे – सोनवणे

आदिवासींना महान संस्कृतीची देणगी आहे. आदिवासींच्या परंपरेचे रक्षण प्रत्येक आदिवासींनी केले पाहिजे

आदिवासींच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण पाहता सर्व आदिवासींनी एकत्र येऊन हक्कासाठी लढले पाहिजे, असे मत ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वहारूदादा सोनवणे यांनी पिंपरीत बोलताना व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड आदिवासी समाजाच्या वतीने क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी अभिनेते वीरा साथीदार, नगरसेवक रामदास बोकड, आशा सुपे आदी उपस्थित होते.
सोनवणे म्हणाले, आदिवासींना महान संस्कृतीची देणगी आहे. आदिवासींच्या परंपरेचे रक्षण प्रत्येक आदिवासींनी केले पाहिजे. या वेळी व्याख्याते सांगल्याभाई वळवी यांचे ‘आदिवासी जीवनाची मूलतत्त्वे’, सतीश पेदाम यांचे ‘आदिवासी चळवळीत आदिवासी युवकांचे योगदान काय असावे?’ तसेच डॉ. संजय लोहकरे यांचे ‘राघोजी भांगरे, बिरसा मुंडा व आजचा आदिवासी युवक’ या विषयावर व्याख्यान झाले. मोहन उंडे यांनी प्रास्तविक केले. मोहन कवटे आणि प्रणिता घोडे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय कोकाटे यांनी आभार मानले.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2015 at 03:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×