दिवाळीचे खाद्यपदार्थ बारमाही मिळू लागले, ऑनलाइन खरेदी सोयीची झाली आणि ती वर्षांतून कधीही होऊ लागली; यंदा ‘दिवाळी पहाट’चेही कार्यक्रम रोडावले. सणासुदीला संगीताची एकंदर साथसंगत कमी झाली.. तरीही दिवाळीला महत्त्व उरतेच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसरा ते दिवाळी हा काळ मराठी माणसाच्या वर्षभराच्या धबडग्यात सगळ्यात आनंदाचा. कोणतेही कर्मकांड नसलेले आणि मंगलमय उत्साह वाढवणारे असे हे दोन सणांच्या मधले दिवस. पाऊस संपलेला असतो. थंडीला सुरुवात होत असते. वातावरणात एक प्रकारची उत्फुल्लता असते आणि सगळे जण या आनंदाच्या उत्सवाच्या तयारीला लागतात. गेल्या काही वर्षांत ही तयारी वेगळी करावी लागतच नाही, कारण अनारसे, चिरोटे, शंकरपाळे हे पदार्थ फक्त दिवाळीतच खात असत, यावर आजच्या तरुणांचा विश्वास बसेल, असे वाटत नाही. किंवा त्यापैकी काही जणांना, हे पदार्थ दिवाळीचे म्हणून माहीतच नसले, तरी हरकत नाही. कपडय़ांची खरेदी वर्षांतून दोनच वेळा करण्याचे दिवस संपले आता. दिवाळी आणि वाढदिवस या मुहूर्ताना आता तसा अर्थही उरलेला नाही. वर्षभर सगळे मॉल कसे फुल्ल झालेले असतात. घरी, दारी, कार्यालयात आणि अगदी प्रवासातही हातातल्या मोबाइलवर खरेदीचा धूमधडाका वर्षभर साजरा होणाऱ्या या काळात कुणाला दिवाळीची वाट पाहणे हा एके काळी खरेदीच्याही आनंदाचा भाग होता, हे कदाचित खरेही वाटणार नाही. फटाके, फराळ आणि कपडे या सगळ्यामुळे वातावरणच आनंदी होई. आता नोकऱ्या दिवसातले बारा तास असतात आणि ती केव्हाही जाण्याची सतत भीती असल्याने दिवाळीच्या निमित्ताने रजा घेण्याची सोयही राहिलेली नाही. काळ बदलला, हे खरे. पहाटे उठून फटाके उडवणे आणि घरातल्या सगळ्यांबरोबर एकत्र राहून दिवस घालवणे, ही आजकालची चैन झाली आहे. अभ्यंगस्नान करून पहाटे पहाटे घराबाहेर पडून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावणे हा बदल आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडू लागला आहे.

Web Title: Editorial on diwali find happiness abn
First published on: 28-10-2019 at 00:05 IST