वाढते करोनाबळी आणि लसखरेदीत केंद्रीकरणानंतर मग राज्यांना अधिकार दिल्याचा देखावा अंगलट येणे हे खरे प्रश्न..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा सातवा वर्धापन दिन साजरा न करण्याचा भारतीय जनता पक्षाचा निर्णय योग्यच म्हणायला हवा. गेल्या वर्षी सहाव्या वर्धापनदिनी भाजपतर्फे सरकारचे मुक्त यशोगान करण्यात येत होते. त्यात गैर काही नाही. वर्धापन दिन हा काही निश्चलनीकरणासारख्या निर्णयांचे स्मरण करण्याचा दिवस नाही. कोणताही पक्ष सत्तेवर असता तरी असाच आत्मगौरव झाला असता. परंतु यंदाच्या वर्धापनदिनी हे असे काही करू नये हे भाजपस वाटले हे महत्त्वाचे. गेल्या काही दिवसांत करोना साथीने देशाची जी दुर्दशा केली आहे ती पाहता वर्धापन दिन साजरा करणे असंवेदनशीलतेचे निदर्शक ठरले असते. तशी टीका करण्याची संधी भाजपने आपल्या विरोधकांना मिळू दिली नाही. वास्तविक सत्तास्थापनेच्या सातव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या तीन घटना आनंदहरण करणाऱ्या आहेत. दुर्दैव असे की हे आनंदहरण एका पक्षापुरते मर्यादित नाही. ते देशाला ग्रासून टाकू लागले आहे. म्हणून त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

Web Title: India s covid vaccine policy central government vaccine policy zws
First published on: 25-05-2021 at 00:35 IST