अनुप, बिहारसारख्या मागास राज्यातल्या एका दुर्गम गावात राहणारा मुलगा. या गावाला नक्षलवाद्यांचे ग्रहण लागलेले. अशा गावात अनुपच्या कुटुंबाला रोजच्या दोन वेळच्या जेवणाची चणचण ही रोजचीच. आठ वर्षांचा असताना अनुप भुकेने अगदी व्याकूळ झाला होता. त्याची ती अवस्था पाहून त्याच्या आईने अनुपच्या वडिलांना थोडे तांदूळ मिळाले तर पाहा, म्हणून सांगितले. तांदूळ आणायला गेलेले वडील परतलेच नाहीत. खूप शोधाशोध केली, पण त्यांचा पत्ता काही लागू शकला नाही. कोणी म्हणे त्यांना नक्षलवाद्यांनी पकडून नेले. अनुपला त्याचे वडील काही मिळाले नाहीतच. अनुप मोठा झाला तो सुडाची भावना घेऊनच. त्याची आई मात्र जाणत होती की, या सगळ्यावर मात करण्यासाठी मोठे शस्त्र म्हणजे शिक्षण. तिने अनुपला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. अनेकदा उपाशीपोटी राहून अनुप दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला खरा, पण पुढे काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे अनेक अनुप बिहारच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांत आहेत. या मुली आणि मुलांजवळ गुणवत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे, शिकण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारीही आहे; मात्र चांगले मार्गदर्शन आणि शिक्षणापुरती आर्थिक मदत यांचा अभावच आहे.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Super 30 anand kumar
First published on: 25-06-2016 at 02:59 IST