भारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत. दोन्ही देशांतील सीमावाद सोडवणे, ‘रोड आणि बेल्ट’ पुढाकारात सहभागी होण्यासंबंधी. भारतीयांना स्वत:च्या राजकीय व्यवस्थेऐवजी स्पर्धक/शत्रू राष्ट्राची राजकीय व्यवस्था अधिक चांगली वाटू लागणे हे तिसरे आव्हान आहे. चौथे मोठे आव्हान हे या देशाच्या संभाव्य अपयशातून उभे राहणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक पटलावरील चीनच्या उदयामुळे भारतापुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा आढावा घेत उपाययोजनांची चर्चा करण्याची गरज आहे. पहिले आव्हान आहे ते दोन्ही देशांतील सीमावाद सोडवण्याचे! जागतिक शक्ती-संतुलन, राष्ट्रीय शक्ती आणि राष्ट्रीय प्राथमिक हित यासंबंधी स्वत:बाबतच्या आकलनातून चीनची सीमा प्रश्नावरची भूमिका निर्धारित होत आली आहे. ढोबळमानाने, सन १९५०च्या दशकात भारताच्या पूर्व क्षेत्रातील विवादित भाग भारताने ठेवावा आणि भारताच्या उत्तर क्षेत्रातील विवादित भाग चीनला मिळावा असे चीनचे म्हणणे होते. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये चीनने संपूर्ण विवादित भागांवर आग्रही हक्क सांगण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र सन १९७८ मध्ये डेंग शिओिपगने ‘चीनचा शांततापूर्ण उदय’ घडवून आणण्याचा संकल्प केल्यानंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुन्हा देवाणघेवाणीच्या सूत्राचा पुरस्कार केला.

मराठीतील सर्व चीन-चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India china relations
First published on: 07-11-2016 at 02:01 IST