प्रतिष्ठेचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ स्वीकारताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी १३ नोव्हेंबर रोजी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश.. ‘व्यावसायिकता’ हे मूल्य पत्रकारितेत रुजले की नाही याची चर्चा उपस्थित करतानाच, ‘वैचारिकते’चे व्यवसायनिष्ठ स्वरूप आणि वैचारिक बांधिलकीच्या नावाखाली पत्रकारितेने गाठलेली पातळी यांबद्दलही सांगणारा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमस्कार, अनंत भालेराव यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना एक प्रकारची धाकधूक वाटते. ज्यांच्याकडून लेखनप्रेरणा घेतली, त्या गोविंद तळवलकर यांना हा पहिला पुरस्कार मिळाला होता. अनंतराव भालेराव यांचं मोठेपण ऐकलं ते गोविंदरावांच्या तोंडून. हैदराबाद मुक्तिलढय़ातील शेवटच्या काळातील अनंत भालेराव आणि तळवलकर यांच्यातील पत्रव्यवहारही तळवलकरांनी दाखविला होता. अनंत भालेराव यांच्याबरोबर काम करण्याची किंवा नरहर कुरुंदकरांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैवच. अनंतराव माणसांत रमणारे; तर गोविंदराव माणसांशी कमीत कमी संबंध येईल असं वागणारे. हे दोन्ही पत्रकार किती मोठे हे सांगण्याची आवश्यकता नाही. या दोघांचा विचारवारसा पुढे नेण्यासाठी ‘त्यांच्या पावलावर पाऊल टाकून..’ म्हणता येणार नाही, पण काही अंशानं पुढे जाताना नम्रतेची आणि जबाबदारीची जाणीव हा पुरस्कार स्वीकारताना मनात नक्की आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professionalism and thoughtfulness loksatta editor girish kuber govind talwalkar first prize amy
First published on: 20-11-2022 at 00:09 IST