तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, जनाबाई आदी अनेकानेक संतांची चरित्रं आपल्याला माहीत असतात; पण त्या चरित्रातून बोध घेऊन आपणही भक्तिमार्गावर दृढपणे चालावं, असं काही आपल्याला वाटत नाही, कारण संतांची गोष्टच निराळी, ते अवतारी होते, असं म्हणून आपण पळवाट शोधून काढतो. भक्तिमार्गात जर फार पुढे गेलो तर प्रापंचिक जबाबदाऱ्यांचं काय होईल, हा एक ढाल-प्रश्नही असतोच! जणू त्या जबाबदाऱ्या आज आपण अगदी बिनचूक पार पाडतोच आहोत! पण भक्तिपंथावर जर आलो आणि खरे भक्त झालो तर तो परमात्मा आपली पूर्ण काळजी घेतो, हे समर्थ आता सांगत आहेत. ‘मनोबोधा’च्या ११६ ते १२५ या दहा श्लोकांत, ‘नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी,’ हीच ग्वाही समर्थ देत आहेत. या सर्व दहा श्लोकांत तपस्वी राजा अंबरीश, ऋषीपुत्र उपमन्यू, राजपुत्र ध्रुव, गजराज गजेंद्र, पापकृत्यांत जन्म गेलेला अजामिळ, असुरपुत्र प्रल्हाद, ऋषीपत्नी अहिल्या आणि द्रौपदीसाठी भगवंतांनी कशी धाव घेतली, याचं वर्णन आहे. दशावतारांचाही उल्लेख आहे. अजामिळ, प्रल्हादाची कथा, त्यावरील चिंतन मागेच आलं आहे म्हणून त्यांची पुनरुक्ती टाळून आपण अन्य कथांचा अत्यंत संक्षेपानं विचार करणार आहोत. या कथा तशा सर्वपरिचित असल्यानं त्यांचा काही वेगळा संकेत आहे का, याचाही आपण थोडा मागोवा घेणार आहोत. प्रथम हे श्लोक आणि त्यांचा प्रचलित अर्थ तेवढा आपण पाहू. हे श्लोक असे आहेत :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहू श्रापितां कष्टला अंबऋषी।

Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 26-07-2017 at 04:02 IST