संस्कृत ही आर्याची भाषा.. मात्र, ‘व्याकरणाने नियमबद्ध असणारी ही भाषा नंतरच तयार झाली असली पाहिजेहे काही तज्ज्ञांचे मत तर्काला पटणारे आहे. तसेच आधी अनेक, नंतरच त्यातून एकया आर्याच्या एकूण धोरणाशीही ते सुसंगत ठरणारे आहे! पण संस्कृत राष्ट्रभाषा होण्यास डॉ. आंबेडकरांनीही पाठिंबा का दिला असावा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समान भाषा हा लोकांना जोडणारा एक महत्त्वाचा घटक असतो. राज्यघटनेच्या अनुसूचीमध्ये १५ भाषांचा उल्लेख असला, तरी भारतात प्रत्यक्षात ६००पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. भारत हे एक राष्ट्र असूनही आपण अद्यापि एक राष्ट्रभाषा घोषित करू शकलो नाही. िहदी ही राज्यकारभाराची भाषा असेल असे घटनेत म्हटले असले, तरी यासाठी पूर्वीप्रमाणेच इंग्रजीचा वापर चालू राहील, अशीही तरतूद करून िहदीला प्रलंबित ठेवले आहे. सर्व प्रदेशांना समजणारी वा मान्य होणारी एकही भाषा नसल्यामुळे इंग्रजीला सर्वमान्यता मिळाली. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळी संस्थानांत तर इंग्रजीला महत्त्व नव्हतेच, पण ब्रिटिश प्रांतांतही राजकीय नेते, समाजसुधारक, सरकारी अधिकारी, प्राध्यापक, साहित्यिक, विद्वान, विचारवंत, वकील, पत्रकार अशा निवडक वर्गापुरतेच ते मर्यादित होते. तरीही, प्रत्येक प्रदेशात असे इंग्रजीज्ञाते असल्यामुळे त्या सर्व प्रदेशांना इंग्रजी मान्य होऊ शकली. एक भाषा मिळाल्यामुळे अखिल भारतीय राष्ट्रकारणाला चालना मिळाली. इंग्रजीमुळेच मराठीभाषक लो. टिळकांना अखिल भारतीय नेतृत्व मिळू शकले. सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे ठराव इंग्रजीत होत असत. इंग्रजी येत नसणाऱ्या देशभरच्या जनतेला ते कसे कळत असत? अर्थात इंग्रजी जाणणारे ते जनतेला त्यांच्या बोलीभाषेत सांगत असत. एक प्रकारे ब्रिटिश काळापासून आतापर्यंत इंग्रजी भाषेने सर्व भारतीयांत विचारांचे आदान-प्रदान घडवून आणले आहे व राष्ट्रैक्य घडवून आणण्यास मदत केली आहे.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanskrit language and language unity
First published on: 11-05-2016 at 04:07 IST