जिल्ह्य़ात मंगळवारी दिवसभरात १ हजार ६०० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे  करोनाबाधितांची एकुण संख्या १ लाख ४९ हजार ४४० इतकी झाली आहे. तर, मंगळवारी जिल्ह्य़ात ३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची एकुण संख्या ३ हजार ९८३ वर पोहोचली आहे.

२ रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ३९६, नवी मुंबईतील ३११, ठाणे शहरातील ३०२, ठाणे ग्रामीणमधील २०८, मीरा-भाईंदरमधील १७७, बदलापूर शहरातील ८१, अंबरनाथ शहरातील ६०, भिवंडी शहरातील ३५ आणि उल्हासनगरमधील ३० रुग्णांचा समावेश आहे. तर, मंगळवारी जिल्ह्य़ात ३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये ठाणे ग्रामीणमधील ७, ठाणे शहरातील ६, नवी मुंबईतील ६, कल्याण-डोंबिवलीतील ५, मीरा-भाईंदरमधील ४, उल्हासनगर शहरातील ३, अंबरनाथ शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे.