पाचपाखाडी भागातील महापालिका मुख्यालय परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. यापैकी काहींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहा दिवसांपासून टेकडी बंगला आणि पाचपाखाडी भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याला दरुगधी येत आहे. यामुळे टेकडी बंगला परिसरातील गंगूबाई शिंपी, निर्मला शिंपी आणि पाचपाखाडी भागातील राकेश पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. दूषित पाण्याचा पुरवठा बंद करून तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.