अंबरनाथमधील विनापरवाना आणि खराब अशा ६० रिक्षांवर कल्याण वाहतूक विभाग आणि अंबरनाथ वाहतूक विभागाने संयुक्त धडक कारवाई केली आहे. या कारवाईच्या वेळी अनेक धूर्त रिक्षाचालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याने ते या कारवाईत सापडले.
सोमवारी दुपारी या कारवाईस सुरुवात झाली. यावेळी अंबरनाथच्या बी-केबिन, शिवाजीनगर, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी पोलिसांनी पहारे उभे करत रिक्षांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यात १५ रिक्षा पूर्णत खराब आणि ४५ रिक्षाचालकांकडे बॅच, कागदपत्रे नसल्याचे आढळले. यातील १५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही कारवाई इथून पुढे नियमित करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against 60 illegal rickshaws
First published on: 28-01-2016 at 03:13 IST