वसईच्या ख्रिस्ती समाजजीवनाच्या रचनेत आळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ख्रिस्ती कुटुंब समूह ज्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांत राहतो त्या भागाला आळी असे म्हणतात. प्रत्येक आळीला वेस असते आणि तेथे क्रूस असतो. हीच वेस प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेली असते. पंचवीस-तीस आळ्या मिळून धर्मग्राम (पॅरीश) तयार होतो. कशा असतात या आळ्या आणि त्यांनी कसे निगडित असते ख्रिस्ती समाजजीवन त्याचा हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी माणूस गटा-गटाने भटकंती करत आपले जीवन जगत होता. कालांतराने तो स्थिरावला अन् एकाच ठिकाणी राहू लागला. तेव्हा मानवी समूहाने एकत्र येऊन वस्ती वसवली. वसईत पोर्तुगीजांचे आगमन झाल्यांनतर ख्रिस्ती समाजानेही आपली स्वतंत्र वस्ती वसवली. ते समूहाने एकत्र राहू लागले. संपूर्ण कुटुंबाचा समूह एकत्र राहतो त्या जागेला आळी असे संबोधतात. पूर्वीपासूनच आळी वसईचा भाग राहिलेली आहे. याच आळी संस्कृतीत मग ख्रिस्ती समाजाच्या आळींचा समावेश झाला. सुमारे ५०० वर्षांपासून ख्रिस्ती आळ्यांचे अस्तित्व वसईत आहे. आळी हा परंपरेने वापरण्यात येणारा शब्द आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Catholic community in vasai structure of christian life in vasai
First published on: 12-09-2017 at 01:37 IST