ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संवेदनशील क्षेत्र असलेल्या येऊरच्या जंगलातील टेकडीवर मुरूम माती वाहून नेण्यासाठी वन विभागाच्याच कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वन परिमंडळ अधिकारी विकास कदम असे लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुरूमाच्या मातीने भरलेल्या १० गाड्या जंगलात सोडण्यासाठी त्याने सहा हजार रुपयांची लाच मागितली. घटनेमुळे येऊरच्या जंगलाचे लचके तोडण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

तक्रारदार हे २३ जानेवारीला येऊरच्या टेकडीवर मुरूमाने भरलेल्या गाड्या नेत होते. त्याचवेळी उपवन येथील येऊरच्या प्रवेशद्वारावर वन परिमंडळ अधिकारी विकास कदम यांनी त्यांच्याकडून १० गाड्यांचे प्रत्येकी ६०० असे एकूण सहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणाची पडताळणी केली असता विकास कदम याने लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून विकास कदम याला ताब्यात घेतले. मागील काही वर्षांपासून येऊरच्या जंगलात मोठ्याप्रमाणात बेकायदेशीरपणे बांधकामे उभी राहिली आहेत. येऊर संवेदनशील आणि शांतता क्षेत्र असूनही याठिकाणी रात्री उशीरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. त्यामुळे येऊरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा