ठाणे : अजित पवार यांना कोण ओळखत, त्यांची ओळख काकांमुळेच आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. अजित पवार जेव्हा पहिल्यांदा निवडून आले, तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते, अशी टीका परांजपे यांनी केली आहे. अजित पवार हे आपल्या कर्तृत्वावर प्रसिद्ध झाले आहेत, बाप, पक्ष चोरून नाही. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात जलमापके बसविण्याचे काम होणार सहा महिन्यांत पूर्ण; जलमापके बसविण्याचे काम २० टक्के शिल्लक

Sadabhau Khot On Raju Shetti
“राजू शेट्टींना प्रचंड अहंकार”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “कार्यकर्त्यांना खड्यासारखं…”
sudhir mungantiwar on raj thackeray
राज ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण का नाही? सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
Dr Srikant Shinde as group leader of Shiv Sena
डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी
After Sanjay Raut allegation interest in Nagpur Lok Sabha election results
संजय राऊत यांच्या आरोपानंतर नागपूरच्या निकालाची उत्सुकता
Rahul Gandhi expressed condolences about P N Patil
जनतेसाठी जीवन समर्पित करणारा नेता गमावला; राहुल गांधी यांनी पी. एन. पाटील यांच्या विषयी व्यक्त केल्या शोकभावना
ajit pawar
पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप; अजित पवार म्हणाले, “उचचली जीभ अन्…”
hasan mushrif on pn patil
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या राजकारणाला धक्का; नेत्यांनी व्यक्त केल्या भावना
cm ekanath shinde inquired earnestly about the health of MLA P N Patil
मुख्यमंत्र्यांकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस

खासदार श्रीकांत शिंदे यांचा जन्म १९८७ साली झाला.  त्यांच्या जन्माच्या आधीपासून अजित पवार हे सार्वजनिक जीवनात सक्रीय आहेत. श्रीकांत शिंदे ज्यावेळेस डायपरमध्ये रांगत असतील, तेव्हा म्हणजे १९९१ साली अजित पवार हे खासदार झाले होते.  तेव्हापासून त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. पण, ज्यांची स्वतःची ओळख ही खोक्यांपासून सुरू होऊन वडील, पक्षचिन्ह आणि पक्षच चोरण्याचे झाली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणारी ओळख ज्यांची आहे, त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करू नये, असे प्रत्युत्तर परांजपे यांनी दिले. राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींबाबत श्रीकांत शिंदे नेहमी एकेरीच उल्लेख करत असतात. त्यावरून त्यांचे  संस्कार आणि संस्कृती नेहमीच दिसून येत असते. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही. परंतु, अजित पवारांवर टीका करताना त्यांनी तारतम्य पाळावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना ३३ देशात ओळखतात पण, ती ओळख काय आहे, याचा श्रीकांत शिंदे यांनी विचार करावा, असा टोलाही त्यांनी लगावला. कर्नाटकात मुख्यमंत्री शिंदे यांना पहायला गर्दी होते, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तेही बरोबरच आहे. कारण, तेथील लोक बघायला येतात की महाराष्ट्रातील असा कोणता “हुशार मुख्यमंत्री”  आहे की जो महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पंतप्रधान असा उल्लेख करतो आणि एमपीएससीचा प्रश्न निवडणूक आयोगात नेतो, असा टोलाही त्यांनी लगावला.  मुंबई आणि खेडच्या सभेत आणलेली माणसे भाषणे ऐकायला का थांबली नाहीत, हे तथाकथित लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सांगावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत आयरे गावात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर मोबाईल मनोरा

शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झालेला धनदांडग्यांच्या पचनी पडत नाही, असेही विधान त्यांनी केले आहे. पण,  महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळीच्या संकटात आहेत. त्यांचे पंचनामे झालेले नाहीत, शासकीय मदत मिळालेली नाही, अशा स्थितीत मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी फिरत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.  उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकात प्रचारासाठी फिरणाऱ्या एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची अवस्था “अमीत शहा आम्हाला वाचवा” अशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आपली राजकीय, सामाजिक आणि वैचारिक उंची आधी तपासून घ्यावी आणि नंतर अजित पवारांवर टीका करावी. अजितदादांनी आपली ओळख आपल्या कामाने निर्माण केली आहे. करोना काळात अजित पवारांच्या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले होते, हे श्रीकांत शिंदे यांनी पहावे, असेही ते म्हणाले.