ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या कोरडय़ा उष्ण वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. शुक्रवारी ठाणे शहरात ४४.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.  शीळ काटई रस्त्यावर पलावा परिसरात ४३ अंश सेल्सिअस, भिवंडी आणि कल्याण शहरात ४२ अंश सेल्सिअस, उल्हासनगर शहरात ४२ अंश सेल्सिअस तसेच तळोजा, डोंबिवली, बदलापूर आणि पनवेल भागात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सकाळच्या वेळेत ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर कडक ऊन यामुळे उकाडा वाढला आहे. रात्रीच्या वेळेतही उष्णतेची दाहकता जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे  अगांची काहीली होऊ लागली आहे.

मुंबईत घट

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात

मुंबई आणि परिसरात गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारच्या   कमाल तापमानात साधारण तीन अंशांची घट होऊन शुक्रवारी सरासरी ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कुलाबा केंद्रात करण्यात आली. सांताक्रुझ केंद्रातील नोंदीनुसारही गुरुवारच्या तुलनेत तापमान काही अंशांनी कमी झाले. गुरूवारी सरासरी ३८.९ सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती तर शुक्रवारी सरासरी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.