tnt01tnt02 मुंबईप्रमाणेच ठाणे शहरावर पोर्तुगीजांची सत्ता होती. १५३३ मध्ये पोर्तुगीज ठाण्यात आले. ठाणे शहरातील आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून त्यांनी खाडीकिनारी ठाणे किल्ला बांधला. तब्बल दोनशेहून अधिक वर्षे ते ठाण्याचे शासक होते. १७३७ मध्ये चिमाजी आप्पा पेशव्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून ठाणे जिंकले. मात्र दोन शतकात उभारण्यात आलेल्या पोर्तुगीज वास्तुशैलीच्या खुणा अजूनही ठाणे शहरात ठिकठिकाणी आढळतात. टाउन हॉलजवळील ही वास्तूही अगदी अलीकडेपर्यंत अस्तित्वात होती. त्या जागी आता महापालिकेची १२ नंबरची शाळा आहे.  
संग्राहक- सदाशिव टेटविलकर, सध्याचे छायाचित्र : दीपक जोशी