गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बदलापूर शहरातील रिक्षा चालकांचा संप अखेर मिटला आहे. पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात स्थानकाशेजारी रिक्षा थांबा हटवल्याने संतप्त रिक्षाचालकांना पालिका प्रशासनाविरूद्ध बेमुदत संप पुकारला होता. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सोमवारी स्थानकाशेजारीच पर्यायी जागा दिल्याने रिक्षाचालकांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बदलापुरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा >>>ठाणे: कार घेऊन दरोडा करण्यासाठी आलेल्यांचा प्रयत्न फसला

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकजवळ होम फलाटाची उभारणी गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने फलाट पूर्णत्वास जात नाही. परिणामी होम फलाटाचे काम रखडले होते. त्यात गेल्या आठवड्यात होम फलाटाला लागून असलेल्या जागेत व्यापाऱ्यांनी ३५ गाळे अनधिकृतपणे उभे केले होते. त्यावर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर होम फलाटासाठी आवश्यक जागाही मोकळी करण्यात आली. यासाठी स्कायवॉकखालील जागेत असलेला रिक्षा थांबा तोडण्यात आला. त्यामुळे रिक्षाचालकांना संताप व्यक्त करत शुक्रवारी रात्रीपासून शहरात बेमुदत संपाची घोषणा केली. शनिवार, रविवार आणि सोमवार दुपारपर्यंत हा संप सुरू होता. प्रामुख्याने बदलापूर गाव, रमेशवाडी, सोनिवली आणि त्यापुढच्या भागातील प्रवाशांना त्याचा फटका बसला. त्यामुळे रिक्षा सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. सोबतच सोमवारी सकाळपासून संप पुकारणाऱ्या रिक्षा चालक मालक वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून नागरिकांच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. नागरिकांनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर दुपारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्यासोबत संप पुकारणाऱ्या रिक्षाचालकांची बैठक झाली. चर्चेअंती स्थानकाशेजारी स्कायवॉक संपतो तेथून पुढे एकरेषेत रिक्षा थांबवण्यास मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी परवानगी दिली. त्यामुळे रिक्षाचालकांनी आपण संप मागे घेत असल्याचे घोषीत केले. अखेर सायंकाळपासून बदलापूर शहरातील रिक्षा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हेही वाचा >>>चार महिन्यात १९५ कोटी मालमत्ता कर वसुलीचे आव्हान ;‘कडोंमपा’ची मागील आठ महिन्यात १८० कोटी वसुली

रिक्षाचालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. त्यात त्यांना पर्यायी जागा दिली आहे. रेल्वेचे होम फलाटाचे काम संपल्यानंतर त्यांचा रिक्षाथांबा पू्र्ववत केला जाईल. – योगेश गोडसे, मु्ख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.