अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग ४१५ चा काही भाग दरीत कोसळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झालाय. ३१ मे रोजी ही दुर्घटना घडली असली तरी सोशल नेटवर्किंगवर मागील दोन दिवसांपासून हा नव्याने बांधण्यात आलेला रस्ता दरीत कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये जोरदार पाऊस पडला. सततच्या पवासामुळे राजधानी इटानगरमधील इंदिरा गांधी पार्कजवळच्या डी सेक्टरमधील डोंगराचा कडा कोसळला. त्यामुळेच या डोंगरावर बांधण्यात आलेला राष्ट्रीय महामार्गाचा एका बाजूला भाग पाहता पाहता काही क्षणांमध्ये दरीत कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

नक्की पाहा >> Viral Video: हा हळदी समारंभ पाहून ‘हेच पहायचं बाकी होतं’ अशीच तुमची पहिली प्रतिक्रिया असेल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डोंगरकड्यावर बांधण्यात आलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने गाड्यांची वाहतूक सुरु असतानाच दरीकडच्या बाजूचा भाग कोसळल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती या रस्त्याचा काही भाग दरीत कोसळल्यानंतर “भाई तूट गया… देईये…” असं म्हणताना ऐकू येत आहे.

नहारलागून आणि इटानगरला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम नुकतचं पूर्ण झालं होतं.  या रस्त्याच्या बांधकामासाठी १८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. हा रस्ता दोन दिवसाच्या पावसामध्ये अशाप्रकारे खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सततच्या पावसामुळे अरुणाचलमधील इतर काही भागांमध्येही जमीन खचल्याच्या घटना घडल्या आहेत.