श्रीलंकेसोबतची तीन सामन्यांची टी-२० मालिका भारतानं २-०ने जिंकली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरनं लगावलेला उत्तुंग षटकार सगळ्यांच्या स्मरणात राहिला. विशेष म्हणजे हा षटकार मारल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डोळे विस्फारून श्रेयसचं कौतूक केलं. त्याला श्रेयसनंही प्रतिसाद दिला. मात्र, या दोघांच्या फोटोवरील मीम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.