नवी दिल्ली (विश्वास न्यूज): लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये चीनच्या भीतीमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने एकाही उमेदवाराला तिकीट दिले नसल्याचा दावा केला आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेची’ ईशान्येकडील राज्यापासून सुरुवात करूनही अरुणाचल प्रदेशचा समावेश नव्हता, असा दावाही या पोस्टमध्ये केल्याचे आढळते. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. 

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडिया यूजर ‘I HATE AAP PARTY’ ने व्हायरल पोस्ट शेयर करत दावा केला आहे की, काँग्रेस पार्टीने चीनच्या भीतीने अरुणाचल प्रदेशमध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले नाहीत. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक वापरकर्त्यांनी याच दाव्यांसह पोस्ट शेअर केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress got afraid of china in loksabha elections 2024 rahul gandhi party candidates back out from arunachal pradesh fact check svs
First published on: 16-04-2024 at 13:54 IST