राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला असून त्याचबरोबर रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीने झोडपले. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि काही भागांत रस्ते पाण्याखाली गेल्याने दोन्ही प्रकारची वाहतूक ठप्प झाल्याचं पहायला मिळालं. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे गौरसमज निर्माण होऊन अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ट्रोल केलं आहे. झालं असं की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष असणाऱ्या फौजीया खान यांनी ईदनिमित्त (२१ जुलै २०२१ रोजी) आपल्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वांसोबतचा फोटो काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फौजीया यांनी ट्विट केला. आज ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी व स्नेहभोजनासाठी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब,मा श्रीनिवास पाटील साहेब, मा प्रफुल्ल पटेल साहेब, मा वंदनाताई चव्हाण, मा सुप्रिया ताई सुळे आपण सर्व उपस्थित राहिलात .. आपले शतशः आभार pic.twitter.com/HXOhQgbt7b — Fauzia Khan (@DrFauziaKhanNCP) July 22, 2021 हा मूळ फोटो २१ जुलैचा आहे. सुप्रिया सुळे यांनी हा फोटो २१ जुलै रोजी रात्री आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला होता. या फोटोचा कोकणतील पुराशी संबंध जोडला जात असली तरी हा फोटो महाराष्ट्रातील नसून फौजीया खान यांच्या दिल्लीतील निवासस्थानामधील आहे. सर्व खासदार मागील आठवड्यापासून पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या खासदारांचाही समावेश आहे. मात्र फौजीया खान यांनी नेमका हा फोटो कोकणात अतीवृष्टी झाली त्या दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी शेअर केला आणि अनेकांना हा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला असा अनेकांचा संभ्रम झाला. बुधवारच्या या फोटोचा संबंध अनेकांनी कोकणतील पुराशी म्हणजेच गुरुवारी आलेल्या अतीवृष्टीशी जोडला आणि राष्ट्रवादीवर टीका केली. एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे सत्तेत असणाऱ्या घटक पक्षातील नेत्यांनी ईदनिमित्त स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे पाहून अनेकांनी या ट्विटखाली संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे हा फोटो २१ तारखेचा असला तरी तो महाराष्ट्रीत अनेक भागांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाल्याच्या दिवशीच सायंकाळी पोस्ट केल्याने अनेकांनी याचा संबंध पुराशी सोडला. पाहुयात याच ट्विट खालील काही कमेंट्स. १) लाजा वाटल्या पाहिजेत ह्यांना अर्धा महाराष्ट्र पाण्यात असताना हे पार्ट्यांमधे व्यस्त आहेत. थोड्यातरी संवेदना आहेत की नाही. की फक्त सत्तेसाठी पावसात भिजायच आणी निवडून आले की जनतेला पाण्यात सोडायच... — ॲड. अजय दत्तात्रय घोलप (@ajay381991) July 22, 2021 २) महाराष्ट्र पुरात बुडतोय आणि इथे तुम्ही मेजवान्या झोडताय. कसले असंवेदनशील लोकं आहात तुम्ही. ते पण निसर्गाची धूळधाण करून बिचाऱ्या बकऱ्या मारून — Vikar Joseph (@bharat15000) July 22, 2021 ३) निवडणुकीत मुद्दाम पावसात भिजणारा योद्धा व त्याचे मंत्री पुराच्या वेळी घरात बसून मेजवान्या झोडताय. — bharatbonapart (@bharatbonapart1) July 22, 2021 ४) इकडे कोकण पाण्याखाली गेला आहे हे जेवणाच्या मेजवान्या करत आहे .कास जमत हो तुम्हाला.. — प्रणय कुळे.. (@Pranay75007865) July 22, 2021 ५) एकदा कोकणकडे बघा Ekada Kokana kade pn bagha — vishwa (@patilg307) July 22, 2021 ६) तुम्ही पार्ट्या करा मस्त छान... इकड गावं पुरात बुडल्यात. तुम्ही पार्ट्या करा — Suraj Patil | सुरज पाटील (@imsurajk7) July 22, 2021 ७) कोकणबरोबर कायम दुजाभाव होतो कोकण पाण्याखाली आहे आणि साहेब मटणाची हाडक फोडत आहेत कोकणचा कायम दुजाभाव होतो — RakeshDdevil (@Rakeshb0508) July 22, 2021 ८) लोक उपाशी मेले तिकडे पुरामध्ये आणि लोक उपाशी मेले तिकडे पुरामध्ये आणि इकडे पार्टी चालू आहेत सांगली महापुरात ज्ञान वाटणारे आज ईदच्या पार्टीत गुंग आहेत@supriya_sule @PawarSpeaks — Puneri (@Puneri9) July 22, 2021 ९) आज कोकवासीयांसाठी का नाही धडपडू शकत सरकार बनवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी धडपडणारे आज कोकवासीयांसाठी का नाही धडपडू शकत का फक्त त्याचे मत भेट पर्यंत धडपडायचे #prayforChiplun — सुनिल Sunil ಸುನಿಲ್ (@patilsunilp) July 22, 2021 १०) लाज वाटत नाही कोकण आणि सम्पूर्ण महाराष्ट्र बूडत आहे,आणि याना लाज वाटत नाही। — Jignesh Joshi.# I SUPPORT CAA NRC (@jigneshjoshi262) July 23, 2021 ११) ही नाटकं बरी सुचतायत कोकण बुडत असताना ही नाटकं बरी सुचतायत — रामभक्त प्रशांत (@prash_rambhakt) July 22, 2021 १२) हे लक्षात राहील ज्या पश्चिम महाराष्ट्र चे तुम्ही नेते म्हणता , तो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मरणाच्या खाईत असताना , तुमची इदी कायम आमच्या लक्षात राहील#आम्ही_बी_ध्यानात_ठेवलंय — Rohit Wable (@RohitWable11) July 22, 2021 १३) तुम्ही तर जनतेच्या आयुष्याचा हसू करून ठेवलंय त्यांनी जनतेला सावरून चेहऱ्यावर हसू आणलं होतं..@supriya_sule तुम्ही तर जनतेच्या आयुष्याचा हसू करून ठेवलंय.. — Mauli (@Mauli_____) July 22, 2021 इतकच नाही तर भाजपानेही यासंदर्भात ट्विटवरुन टीका केलीय. फौजीया यांनी केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुंबई भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. "कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडत होते. संवेदनशीलपणाचा कळस," अशा कॅप्शनसहीत मुंबई भाजपाने हा फोटो शेअर केलाय. कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडत होते. ! संवेदनशीलपणाचा कळस ! #MahaNapasAghadi pic.twitter.com/JK7vjUm4xT — BJP Mumbai (@BJP4Mumbai) July 22, 2021 दरम्यान या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावरुन वाद सुरु असला तरी दुसरीकडे आजही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतरही दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आणखी तीन ते चार दिवस मुसळधारांचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांत २३ जुलैला मुसळधार आणि त्यानंतर तीन दिवस पाऊस कायम राहणार आहे.