भारतीय संस्कृतीत गाय या प्राण्याला विशेष महत्व आहे. प्रत्येक सणासुदीला इतर देवतांप्रमाणेच गायीसाठीही नैवेद्य काढला जातो. तीन वर्षांपूर्वी गायींच्या संरक्षणासाठी गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला मंजुरी मिळाली होती. परंतु भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे? यामागे काही पौराणिक संदर्भ आहेत का? या प्रश्नांची उत्तरं देतायत पौराणिक साहित्याचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक.