वसई : गुन्हा उघडकीस आणल्यानंतर भक्कम पुरावे न्यायालयात सादर करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात मीरा -भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय या वर्षी देखील सर्वोत्तम कामगिरी करत आहे. चालू वर्षांतील पहिल्या आठ महिन्यांत आयुक्लालयातील गुन्ह्यंच्या दोषसिद्धीचे प्रमाण ६० टक्कय़ांहून अधिक आहे. विशेष म्हणजे मागील वर्षांत आयुक्तालयीतल दोषसिध्दीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक म्हणजे ८९ टक्के एवढे होते.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने गुन्ह्यतील आरोपींना न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पुरावे कसे गोळा करावे याबाबचे मार्गदर्शन सातत्याने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडून केले जात होते.  त्याचा सकारात्मक परिणाम यंदाही दिसून आला.  दोषसिद्धीत आयुक्तालाय राज्यात अव्वल ठरले होते. यंदा देखील आयुक्तालय राज्यात अव्वल ठरेल असा विश्वस पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra maintains monopoly in sugar production
साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम; सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

 न्यायालयातून पुराव्या अभावी सुटलेल्या १० प्रकरणांचा अभ्यास दरवर्षी करून त्यातील त्रुटी तपासल्या गेल्या. न्यायालयात पैरवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करम्ण्यात आली. प्रत्येक प्रकरणात साक्षीदारांना न्यायालात आणण्याचे काम हा अधिकारी करत होता. त्यामुळे साक्षादारांचे भक्कम पाठबळ मिळू लागले आणि गुन्हे न्यायालयात सिद्ध होऊ  लागले.

८ महिन्यातील दोषसिद्धी

एकूण खटले—   १,२८१

दोषसिद्धी—     ६३६

तडजोड—      १९८

निर्दोष—        ४३७

टक्के— ६०