लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात डेंगू आणि मलेरिया आजाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मागील महिन्याभरात बाधित रुग्ण संख्येत चार पटाहून अधिकची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फ़त शहरात डेंगू व मलेरिया सारख्या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून विविध स्वरूपाच्या उपाय योजना आखण्यात येतात. यात प्रामुख्याने औषध फवारणी, पाणी शुद्धीकरण आणि स्वच्छतेचा समावेश आहे.मात्र तरी देखील डेंगू व मलेरिया या साथ रोग आजाराची लागण होऊन बाधित होणाऱ्याचे प्रमाणात पालिका दप्तरी वाढतच असल्याचे दिसून येते.त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

आणखी वाचा-शहरबात : आसपास वावरणारे शैतान…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात जुलै महिन्यात डेंगू आजाराने बाधित असलेल्या संशयित रुग्णांची संख्या ही २२ इतकी होती. मात्र ऑगस्ट महिन्या अखेरीस हा आकडा ६७ वर पोहचला होता.याच प्रमाणे जुलै महिन्यात मलेरिया आजाराचे १९ संशयित रुग्ण असताना हा आकडा ऑगस्ट महिन्यात तब्बल ७२ पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता वेळेत उपचार घेण्याचे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी केले आहे.