वसई: चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संतप्त झालेले नागरिकांनी मंगळवारी कामण येथे रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास दोन तास या आंदोलनकर्त्यांनी हा राज्य मार्गाचा रस्ता रोखून धरला होता. चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघात ही घडतात. तर दुसरीकडे धुळीचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

मात्र तरीही या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी कामण परिसरातील नागरिकांनी  एकत्र येत मंगळवारी कामण नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वाहतूक संघटना ही सहभागी झाल्या होत्या.

emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
traffic jam Katai Karjat State Highway Khoni Nevali village
Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
Pune Traffic, Pune Encroachment , Muralidhar Mohol,
पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…

हेही वाचा… अखेर वसई-भाईंदर रो-रो सेवेस सुरुवात, प्रायोगिक तत्त्वावर सेवा; प्रवाशांना मोठा दिलासा

मागील अनेक वर्षपासून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी संघर्ष करीत आहेत. परंतु प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला. या आंदोलनात शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याने भिवंडी हुन वसईकडे येणारी व वसईतून भिवंडी कडे जाणारी वाहतूक जवळपास दोन तास आंदोलन कर्त्यांनी रोखून धरली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाहीत तो पर्यँत टोल वसुली बंद करण्यात येईल याशिवाय या रस्त्याच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव झाला आहे त्याला मंजुरी मिळताच काम सुरू होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्याच्या आधी संपूर्ण रस्ता दुरूस्त झाला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करून पूर्ण कोंडी करू असा इशारा ही यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

Story img Loader