वसई : आधी अभ्यासाचा आणि परीक्षेचा तणाव, त्यानंतर निकालाची धाकधूक आणि अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने येणारे नैराश्य… विद्यार्थीदशेतील ही जीवनशैली विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून १० वी आणि १२ वीच्या निकालानंतर राज्यात १८ हून अधिक विद्यार्थांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. असे असताना विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी शिक्षण विभागामार्फत उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.

शिक्षण क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे व समाजमानसातील चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येतो. यामुळे विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्याच्या विविध भागांत १० वी-१२ वीचे निकाल लागल्यापासून किमान १८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात काही ९ वीमधील विद्यार्थीही आहेत. राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे विद्यार्थ्यांचा तणाव दूर करून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी ४१० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र या समुपदेशकांची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचत नाही. संकेतस्थळावरही सहजगत्या समुपदेशकांची माहिती मिळत नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून सरकारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिक्षणक्षेत्रातून होत आहे. महेंद्र गौरीकुमार बैसाणे ऊर्फ भारुकाका हे सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात या मागण्यांसाठी त्यांनी आझाद मैदानात उपोषणही केले होते. फेब्रुवारीमध्ये शालेय शिक्षण विभागाने पत्र पाठवून राज्य शैक्षणिक परिषदेच्या संचालकांकडून मागवलेला खुलासा अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही. या निकालांच्या पार्श्वभूमीवर उचित समुपदेशनाची तसेच आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. वसई आणि भाईंदरमध्ये यंदा निकालानंतर ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कमी गुण मिळाल्याने ३ विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्या. तर ९ वीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

Pune shaharbat Competitive Examination in years A scholar Security audit Pune print news
शहरबात: अभ्यासिकांचा सुळसुळाट… सुरक्षिततेचे काय?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Congestion at Chitnis Park Chowk raises safety concerns for New English Medium School students
गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…
प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
maharashtra state board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : राज्य शालेय शिक्षण मंडळाला ‘सीबीएसई’चाच अभ्यासक्रम का राबवायचाय? त्यावरून वाद का सुरू आहे?
Pharmacy, management courses hit , Pharmacy,
प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना फटका
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
Indian student prefer Ireland marathi news
भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला पसंती… किती झाली विद्यार्थिसंख्या?

हेही वाचा >>>वसईत दोन मुलांचा बुडून मृत्यू, अन्य मुलांचा शोध सुरू

१० वी, १२ वीच्या निकालानंतर यंदा राज्यातील १८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या रोखण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई महानगरात सर्वाधिक आत्महत्या

यंदा १० वी, १२वीच्या निकालानंतर मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मिळून सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे. त्याखालोखाल चार, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात प्रत्येकी तीन, मराठवाडा आणि कोकणात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने निकालानंतर जीवन संपविले आहे.

विद्यार्थ्यांना असलेला तणाव आणि आत्महत्यांबाबत शिक्षण मंडळ, शालेय शिक्षण विभाग यांना या धोक्याची कल्पना देऊनही काही उपाययोजना केलेल्या नाहीत.– महेंद्र बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते