पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उत्तर काश्मिरमधील उरी येथील ब्रिगेड स्तरावरील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. उरीतील हल्ल्याला भारत नक्कीच उत्तर देईल. फक्त ठिकाण आणि वेळ आम्ही ठरवू, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच म्हटले आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषेवरही सध्या कमालीचा तणाव आहे.