राज्यातील सत्तानाट्य पाहता, कोणता पक्ष कोणाला कधी जाऊन मिळेल, याची जनतेला शाश्वतीच राहिलेली नाही. अशा परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१४ साली विधानसभा निवडणुकीसाठी नांदेडमध्ये घेतलेल्या एका सभेत जोरदार हल्लाबोल केला होता.
या सभेत ते तावातावाने म्हणाले होते की, ज्या वेळेला माणसाच्या आतला आत्मसन्मान जेव्हा मरतो तेव्हा उरतात फक्त प्रेतं…. तुमच्यातला आत्मसन्मान जागा असेल तर या चारही पक्षांच्या पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून द्या…. जे तुमच्याशी खेळत बसले आजपर्यंत. पोरखेळ लावलाय नुसता. महाराष्ट्र म्हणजे यांची जहागीर. हे करतील त्या सगळ्या गोष्टी. हे चारही पक्ष आतमधून एकमेकांना मिसळलेली आहेत.