एल्गार परिषद प्रकरण न्यायप्रविष्ट असून अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेणार आहे. तसेच, शरद पवार यांच्याशी देखील चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आव्हानं स्वीकारायला आवडतात, म्हणून गृहमंत्रिपद घेतलं असल्याचेही सांगितलं.