यंदाचे साहित्य संमेलन हे शासनाने मंजुर केलेल्या मराठवाड्याच्या २३ टीएमसी पाण्याचा अनुशेष हा भरला जाईल, अशा आशेवरती पाण्याची टंचाई सोसत राहणाऱ्या आणि तरी देखील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असलेल्या अशा उस्मानाबादसारख्या परिसरात होतं आहे, याचा मनापासून आनंद आहे. सत्ता आणि वृत्ती गांभिर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार किंवा कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्या पलीकडेच जाणारा असतो. या सगळ्यामधून भ्रष्टतेला दूर सारणाऱ्या निकोप वाड्मयीन चळवळी उभं राहणं मात्र गरजेचं आहे, असं मत साहित्य संमेलनच्या माजी अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी संमेलनातील भाषणाप्रसंगी व्यक्त केले.