ल़ॉकडाउन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. यातील काही उद्योगांनी नाल्यांमध्ये प्रक्रियेविना पाणी सोडण्याचे परिणाम लागलीच दिसून आले आहेत. बोईसर जवळच्या दांडी-नवापूर खाडीमध्ये हजारोच्या संख्येने मासे मेल्याचे दिसून आले. पाण्यामध्ये मिसळलेल्या रसायनांच्या मुळे खाडीमध्ये असलेले लहान व मध्यम आकाराचे बोई मासे मृत पावल्याचे दिसून आले आहे.