ऐंशीमध्ये आमचं सरकार होतं एक दिवशी मला गृहमंत्र्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी नागपूरला अधिवेशनात होतो. त्यामुळे शनिवारी दिल्लीत येईन असं मी त्यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितलं. शनिवारी मी दिल्लीत गेलो त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान इंदिरा गांधी यांना तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांची भेट घेतली. तेव्हा इंदिराजींनी सुरुवातीला तुम्ही सरकार खूप चांगलं चालवत आहात असं म्हणत कौतुक केलं. त्या म्हणाल्या नव्या पिढीसाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांचा रोख संजय गांधी यांच्याकडे होता. मूळ विचारधारा तुमची काँग्रेसची आहे. तेव्हा काँग्रेसला मदत केली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. मी त्यांचं म्हणणं ऐकलं. तुमची साथ हवी असं त्या म्हणाल्या. मी त्यावेळी त्यांना एकाचाच विचार कसा करायचा असं म्हटलं. त्यानंतर आमची बैठक संपली. मी मुंबईत परतलो. दुसऱ्या दिवशी रात्री मला निरोप आला की तुमचं सरकार बरखास्त झालं आहे. काही दिवसांपूर्वीच साठीचा गझल महाराष्ट्राचा हा कार्यक्रम लोकसत्ताने आयोजित केला होता. ज्यामध्ये शरद पवार सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ही आठवण सांगितली.