लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या तर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अयपशी ठरले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे, असा अस सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांनी ‘अबकी बार गोळीबार सरकार’ असे म्हणत भाजपा आणि फडणवीसांवर टीका केली. सुळे यांच्या याच टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.