भाजपाला निवडणुका नुसत्या जिंकायच्या नाहीत तर ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगात त्यांना यस सर करणारेच लोक हवे आहेत, अशाच लोकांची नियुक्ती केली जाते आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयुक्त हे भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. घटनात्मकदृष्ट्या काम करत नाहीत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही आता लोकशाहीची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू शकत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.