मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री तीन वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली. आपल्याविरोधातील कटकारस्थान थांबले नाही तर ४८ पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला होता. पत्रकाराच्या या प्रश्नानंतर फडणवीसांच्या फोनचा उल्लेख करत जरांगेंनी त्याबाबत स्पष्ट केलं.