रेश्मा भुजबळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात सरकारी पातळीवर स्त्रियांच्या सक्षमीकरणाला १९ व्या शतकाच्या अखेर प्रारंभ झाला असला तरी स्त्रियांना देश स्वतंत्र झाल्यापासून मिळालेल्या मतदानाच्या अधिकारापासूनच सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले म्हणण्यास हरकत नाही. स्त्रियांना आर्थिक, सामाजिक, नैतिक, शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवणे म्हणजे सक्षमीकरण होय अशी ढोबळ व्याख्या करता येते. संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून तर आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला. भारतात यानंतर सहाव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत म्हणजे १९७५-८० दरम्यान महिलांसंबंधीच्या तरतुदींमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली. १९९० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली तर १९९३ मध्ये महाराष्ट्रात या आयोगाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने समाजातील महिलांच्या मूलभूत गरजांसाठी महिला व बालविकास विभाग स्थापन केला.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on women empowerment within 70 years of the republic abn
First published on: 26-01-2020 at 01:06 IST