पश्चिम बंगालमधील शारदा कंपनीच्या चिटफंडमध्ये गुंतवणूक केलेल्या एका महिलेने आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस येताच जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तृणमूल नेत्यांची नावे या चिटफंडशी जोडली गेल्याने या घोटाळ्याने राष्ट्राचे वृत्त-कुतूहल जागृत केले. शारदा कंपनीच्या या चिटफंडमध्ये अडीच ते साडेतीन लाख नागरिकांची सुमारे १२ हजार कोटी रुपयांची रक्कम असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी गुंतवणूकदारांची संख्या पाहता हा घोटाळा कित्येक हजार कोटी रुपयांचा असल्याचे समोर येत आहे. चिटफंड अथवा भिशीपद्धत भारतामध्ये अधिकृतरीत्या १९७५ पासून सुरू आहे. केरळ राज्यामध्ये या चिटफंडच्या आधारे मोठय़ा प्रमाणावर प्रगती साधली गेली, मात्र १९९० नंतर चिटफंडला घोटाळ्यांचे ग्रहण लागण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढू लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोटाळा कसा झाला ?
महागडय़ा ‘ग्लॉसी पेपर्स’वरील जाहिरात पत्रकांद्वारे शारदा कंपनी आपल्या विविध योजनांमध्ये पैसे ओतण्यास गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असे. आकर्षक आणि भरगच्च व्याजाचा परतावा असल्याने गुंतवणूकदार या चिटफंडकडे खेचले जात. त्यात कंपनीने भासविलेली तृणमूल काँग्रेसची जवळीक ही गुंतवणूकदारांना आपल्या ठेवींबाबत विश्वास देण्यात मदत करीत होती. शारदा कंपनीच्या दोन कार्यालयाची उद्घाटने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल्यामुळे नागरिकांचा या कंपनीवरचा विश्वास उत्तरोत्तर बळावत गेला.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of carod chit fund scam
First published on: 26-04-2013 at 12:22 IST