महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना येथील कदम कुटुंबीयांनी माजी महापौर शिवाजीराव कदम यांचा वाढदिवस आज साध्या पध्दतीने साजरा केला. दुष्काळग्रस्तांसाठी १ लाख रूपयांचे धान्य त्यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्याकडे सुपूर्द केले. यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून समाजातील विविध घटक दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. अगदी शालेय विद्यार्थीही मुठभर धान्याचे योगदान दुष्काळग्रस्तांसाठी देत आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी १ लाख रूपयांचे धान्य दुष्काळग्रस्तांसाठी देण्याची संकल्पना पुढे आणली. कदम कुटुंबीयांनी ही संकल्पना उचलून धरली आणि धनंजय महाडिक युवाशक्तीकडे धान्यवितरणाची जबाबदारी सोपविली. या वेळी धनंजय महाडिक, अ‍ॅड.श्यामराव शिंदे, रामराजे कुपेकर, आर.एन.सरनाईक, तानाजी कदम, गुणाजीराव कदम, चंद्रकांत कदम, संतोष कदम, नगरसेवक सत्यजित कदम आदी उपस्थित होते.