कै. नाना निजसुरे स्मृती मंच व भक्तियोग सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ एप्रिल ते ४ मे २०१३ या काळात सायंकाळी ७.३० वाजता भक्तियोग सहनिवास पटांगण, वजिरा नाका, बोरिवली (प) येथे संस्कार व्याख्यानमाला आयोजिली आहे.  २८ एप्रिल- अभिजीत घोरपडे (माणूस, पर्यावरण व दुष्काळ), २९ एप्रिल- अंबरीश मिश्र (सिनेमा- शंभर वर्षांची सुंदरी), ३० एप्रिल- जयंत सहस्रबुद्धे (विवेकानंद व विज्ञान), १ मे- नंदिनी आत्मसिद्ध (वंग लेखिकांचे सामाजिक भान), २ व ३ मे- डॉ. शेषराव मोरे (काँग्रेस व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?) ४ मे- एअर मार्शल भूषण गोखले (राष्ट्रीय सुरक्षा व वायुदलाची भूमिका). ही व्याख्याने आहेत.