उन्हाळ्याची तीव्रता अजून कायम असताना पाणीटंचाईची तीव्रता मात्र दिवसागणिक वाढतेच आहे. मराठवाडा विभागात पाण्याची टंचाई असलेल्या १ हजार ८१० गावे व ८९६ वाडय़ांना २ हजार ३१८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विभागात ४ हजार ८०९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ातील ५३६ गावे, २६ वाडय़ांना ७०३ टँकर, जालना ४३९ गावे, १११ वाडय़ांना ५५५, परभणी २१ गावे, ४ वाडय़ांना २६ टँकर, नांदेड ९९ गावे, ६० वाडय़ांना १९१ टँकर, बीड ५०६, ६५९ वाडय़ांना ५६८ टँकर, उस्मानाबाद १७८ गावे, ३३ वाडय़ांना २४३ टँकर, लातूर १७ गावे, २ वाडय़ांना १९ टँकर व हिंगोली जिल्ह्य़ातील १४ गावे, एका वाडीला १३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली.२९४ चारा छावण्याटंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर विभागात २९४ चारा छावण्या सुरू आहेत. या छावण्यांतील जनावरांची संख्या २ लाख ३६ हजार ४५८ आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील १०४ छावण्यांमध्ये ५१ हजार ९७७ जनावरे, जालना ७९ छावण्यांमध्ये ४५ हजार ८९३, बीड ८२ छावण्यांमध्ये १ लाख १५ हजार ६४३, परभणी एका छावणीत ३५२ व उस्मानाबाद जिल्ह्य़ातील २८ छावण्यांमध्ये २२ हजार ५९३ जनावरांचा समावेश आहे.