बस व जीपची समोरासमोर धडक होऊन औरंगाबाद येथील तीनजण ठार, तर सातजण जखमी झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास बीड-औरंगाबाद मार्गावर गेवराईजवळ बाग िपपळगाव येथे हा अपघात घडला.
औरंगाबादहून बीडकडे येणारी बस (एमएच २० डीएल २६८५) व बीडहून औरंगाबादला जाणारी जीप (एमएच ४ बीए २०२७) या गाडय़ांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीप रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर खड्डय़ात पडली. जीपमधील राजेंद्र शिवाजी देशमुख (वय ५०), राजेश्री राजेंद्र देशमुख (वय ४५, औरंगाबाद) व सरोजिनी कुलकर्णी (वय ७०, औरंगाबाद) हे तिघे जागीच ठार झाले. जीपचालक सुनील मनोहर चव्हाण (लाहुरी, तालुका कंधार) याच्यासह माया देशमुख, पृथ्वीराज, अतुल कुलकर्णी, पायल राजेंद्र देशमुख (औरंगाबाद) व बसमधील दिगांबर सखाराम खोबरे (बीड) जखमी झाले. अपघातानंतर जवळच्या प्रवाशांनी व बसमधील काही लोकांनी जखमींना बाहेर काढण्यास प्रयत्न केले. माहिती मिळताच गेवराईचे आमदार बदामराव पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.