जर गोलंदाजांनी कामगिरीमध्ये सातत्य राखले तर भारतीय संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवू शकेल, असे मत भारताला माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले आहे.
‘‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दडपण आले होते. पण पाकिस्तानचा वहाब रियाझ वगळता एकाही गोलंदाजाला अचूक मारा करता आला नाही. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांनीही कामगिरीत सातत्य राखले तर ते ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दडपण आणू शकतात,’’ असे लक्ष्मण म्हणाला.