भारतीय रेल्वेसेवेचे जाळे अधिक अत्याधुनिक व्हावे, सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या काया कल्प परिषदेचे अध्यक्षपद रतन टाटा भूषवणार आहेत. टाटा यांच्याव्यतिरिक्त अखिल भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघ व भारतीय रेल्वे कर्मचारी राष्ट्रीय महासंघ या दोन रेल्वे कर्मचारी संघटनांचे सरचिटणीस अनुक्रमे शिवगोपाल मिश्रा व एम. रघुवय्या हेही काया कल्प परिषदेचे सदस्य असतील, अशी माहिती रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. आणखीही काही सदस्यांची निवड या परिषदेवर केली जाईल, असेही प्रवक्त्यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काया कल्प परिषदेची संकल्पना मांडली होती.