उमेदवाराची आकलनक्षमता, विचार-प्रक्रिया, उमेदवाराची अभिव्यक्ती, लेखन आणि संवादाचे कौशल्य इत्यादी गोष्टी जोखण्यासाठी इंग्रजी व मराठी या दोन अनिवार्य भाषा विषयांचा मुख्य परीक्षेत समावेश करण्यात आला आहे. अनिवार्य इंग्रजी व मराठी विषय १०० गुणांसाठी आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या (बारावीच्या) समकक्ष असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. मागील वर्षी भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका पारंपरिक पद्धतीच्या होत्या. आयोगाकडून २०१५ मध्ये भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका बहुपर्यायी प्रकारच्या असतील अशी घोषणा करण्यात आली व त्याबाबत उमेदवारांच्या प्रतिक्रिया मागविण्यात आल्या. या अनुषंगाने भाषा विषयांचे पेपर्स वस्तुनिष्ठ पद्धतीने असतील की पारंपरिक पद्धतीने याबाबत आयोगाकडून अद्याप कुठला निर्णय घोषित करण्यात आलेला नाही. आयोगाकडून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्येही याबाबतचा स्पष्ट उल्लेख नाही. अभ्यासक्रमातील व्याकरणाचा भाग बहुपर्यायी व आकलन, लेखनाचा भाग पारंपरिक असेल असा आमचा अंदाज आहे. पेपर्स पारंपरिक प्रकारचे असल्यास त्यांच्यासाठीच्या तयारीची व पेपर सोडवण्याची रणतीनी कशी असावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करूयात. व्याकरण हा विभाग पकीच्या पकी गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळे व्याकरणावरची पकड मजबूत असायला हवी. नियम समजून घेणे व सराव करणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. व्याकरणाचा भाग बहुपर्यायी पद्धतीचा असेल. नियम नेमकेपणाने माहीत असतील तरच पकीच्या पकी गुण मिळू शकतील. अन्यथा गोंधळात टाकणाऱ्या पर्यायांमधून योग्य उत्तर शोधण्यात बराच वेळ खर्च होईल. लेखन : निबंध हा सर्वात जास्त गुण असलेला प्रश्न आहे. वैचारिक, समस्याधारित निबंधात विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आíथक व इतरकाही संबंधित पलू विचारात घ्यावेत. सरळ या मुद्यांचा तक्ता बनवून त्यात सुचणारे मुद्दे भरावेत. यानंतर योग्य व समर्पक मुद्दे (साधारणपणे १० ते १२) निवडून त्यांचा क्रम ठरवावा. परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता इत्यादींचा वापर करता येईल. सुरुवातीनंतर ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व ठोस निष्कर्ष मांडत निबंधाचा शेवट करावा. कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेच्या अतिशयोक्त भराऱ्या असू नयेत. ‘कल्पना’सुद्धा तार्किक असाव्यात. निबंध लेखनास थेट सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी दहा मिनिटे सुचतील ते मुद्देमांडत राहावे. त्यानंतर पुढची पाच मिनिटे त्यांचा क्रम, सुरुवात व शेवट ठरवण्यासाठी वापरावीत व पुढच्या १५-२० मिनिटांत प्रत्यक्ष लेखन करावे. कार्यालयीन/औपचारिक पत्रांसाठीची ‘रचना’ पक्की लक्षात असायला हवी. या पत्रांची भाषा औपचारिक असणे व मुद्देसूदपणे म्हणणे मांडणे आवश्यक आहे. अनौपचारिक पत्रांमध्ये भाषा थोडीशी मित्रत्वाची किंवा कमी औपचारिक असावी. नात्यांप्रमाणे योग्य ते अभिवादन व मायना वापरण्याकडे कटाक्ष ठेवावा. मुलाखत अथवा पत्रकार परिषदेमध्ये संवादाचा ओघ राहील अशा प्रकारे लेखन करणे आवश्यक आहे. दोन व्यक्तींमधील संवाद हा दोघांचे वेगवेगळे दृष्टिकोन गृहीत धरून रंगवलेल्या चच्रेच्या स्वरुपात असावा. ही चर्चा एका निष्कर्षांपर्यंत पोहोचायला हवी. शब्दमर्यादेचे पालन व्हायलाच हवे. आकलन या बाबतचे प्रश्न चार प्रकारे विचारले जातात. भाषांतर, सारांश लेखन, आशय लेखन आणि उताऱ्यावरील प्रश्न. सारांश लेखन : उताऱ्याचा सारांश उताऱ्याच्या अर्धा होईल इतक्या शब्दमर्यादेत व स्वत:च्या शब्दात लिहायला हवा. उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी तक्त्याच्या स्वरूपात वेगळे पान दिलेले असते व प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे तक्त्याच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते. संपूर्ण उतारा वाचत बसण्यापेक्षा सरळ पहिला परिच्छेद वाचून त्याचा सारांश लिहायचा मग पुढच्या परिच्छेदाचा सारांश असे करत गेल्यास वेळेची बचत होते. स्वत:चे मतप्रदर्शन टाळावे. उताऱ्यातील अवतरणे, उदाहरणे इत्यादी वगळावीत. संज्ञा, संकल्पनांचे स्पष्टीकरण अजिबात देण्याची आवश्यकता नाही. विचारले असले तरच छोटेसे समर्पक शीर्षक द्यावे. भाषांतर : इंग्रजी व मराठी यांच्या वाक्यरचनेमध्ये मूलभूत फरक आहे हे व्यवस्थित समजून घ्यायला हवे. विशेषत: इंगजीतून मराठी भाषांतर करताना वाक्यरचना एकदम कृत्रिम होण्याची शक्यता असते. तेव्हा आधी वाक्य व्यवस्थित वाचून त्याचा भावार्थ समजून घ्यावा आणि मग त्याचे मराठी वाक्य लिहावे. आधी मनातल्या मनातच वाक्याचा भावार्थ ज्या भाषेत उत्तर लिहायचे त्या भाषेत उच्चारला की हे सोपे होऊन जाते. ’ काही वेळेला एखाद्या शब्दाला प्रतिशब्द सापडला नाही. अशा वेळी त्या प्रतिशब्दासाठी अडून बसण्यापेक्षा वाक्याचा भावार्थ नीट मांडला जाईल, अशी वाक्यरचना करावी. दिलेल्या संपूर्ण उताऱ्याचा असा ‘स्वैर अनुवाद’ करणे मात्र टाळावे. आशय लेखन : उताऱ्यातील मुख्य कल्पना, विषय समजून घेऊन आपल्या शब्दात मांडणे अपेक्षित असते. उताऱ्याची मुख्य/मध्यवर्ती संकल्पना मांडून पुढे उताऱ्यामधील मुद्यांच्या आधारे स्वत:च्या भाषेत स्पष्टीकरण देणे अभिप्रेत असते. यामध्ये शब्दमर्यादा असतेच. सारांश लेखन व आशय लेखनामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे यामध्ये पूर्णपणे स्वत:च्या भाषेत, उदाहरणांसहित स्वत:चे वाक्यप्रचार, म्हणी वापरून ‘आशय’ व्यक्त करायचा असतो, तर सारांश लेखनामध्ये जास्त स्वातंत्र्य घेता येत नाही. उताऱ्यावरील प्रश्न : आधी उतारा वाचून घ्यावा. यावेळी वस्तुनिष्ठ माहिती व संज्ञांना अधोरेखित करावे. पहिल्या वाचनानंतर प्रश्न पाहावेत. काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले असतील तर त्यांची उत्तरे लिहून घ्यावीत. संकल्पनात्मक व आशय विचारणारे प्रश्न पाहून त्यांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा पुन्हा एकदा वाचावा. दुसऱ्या वाचनातून आशयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देता येतील. या प्रकारात उताऱ्याला शीर्षक देणे, लेखकाचा हेतू, उद्देश अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. शीर्षक छोटेसे व समर्पक असावे. प्रश्नांची उत्तरे स्वत:ची शब्दयोजना करून लिहावीत. उताऱ्यातून कॉपी-पेस्ट करू नयेत.