महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आखल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मागील लेखात आपण घेतली. यातीलच आणखी काही योजना. * भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती 0 योजनेचा उद्देश - अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधित सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना आणि कागद, काच, पत्रा वेचकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. 0 प्रवर्ग - ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे. 0 लाभाच्या अटी / निकष - उत्पन्नाची अट नाही. अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच, नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका आयुक्त/ उपायुक्त/ प्रभाग अधिकारी यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे. * लाभाचे स्वरूप - 0 इयत्ता पहिली ते दुसरीपर्यंतच्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु ११०/- व तदर्थ अनुदान रु ७५०/- 0 इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. ११०/- व तदर्थ अनुदान रु. ७५०/- 0 इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. ७००/- व तदर्थ अनुदान रु. १०००/- * सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना योजनेचा प्रवर्ग - विमुक्त जाती व भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग 0 योजनेचा उद्देश - माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजा, भज व विमाप्र प्रवर्गाच्य मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनाने २००३-०४ या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना लागू केलेली आहे. 0 लाभाच्या अटी / निकष - संबंधित घटकांतील विद्यार्थिनीने शासनमान्य माध्यमिक शाळेत प्रवेश घेतलेला असावा व ती इ. आठवी ते दहावीपर्यंत वर्गात नियमित शिकत असावी. उत्पन्नाची अट नाही. 0 लाभाचे स्वरूप - इ. आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा रु. १००/- या प्रमाणे १० महिन्यांसाठी रु. १०००/- एवढी शिष्यवृत्ती संबंधित शाळेमार्फत त्यांचे उत्पन्न व गुणांची अट लक्षात न घेता देण्यात येते. * भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती - * योजनेचा उद्देश - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ही शिष्यवृत्ती दिली जाते. * प्रवर्ग- अनुसूचित जाती व नवबौद्ध * लाभाच्या अटी / निकष - 0 विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. 0 विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा. 0 विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. * लाभाचे स्वरूप - 0 विद्यार्थ्यांस निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबींवरील शुल्क प्रदान. 0 अभ्यासक्रमाच्या वर्गवारीनुसार वसतिगृहात न राहणाऱ्यांना रु. २३० ते ४५० या दराने निर्वाह भत्ता. 0 वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ३८० ते १२०० निर्वाह भत्ता. * अनुसूचित जाती व नवबौद्ध असलेल्या १०० विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिष्यवृत्ती * योजनेचा उद्देश - अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी यासाठी देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या या घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. * लाभाच्या अटी / निकष - 0 विद्यार्थी पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न रु.६ लाखपर्यंत असावे. 0 या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या संस्थेत संबंधित विद्यार्थ्यांला प्रवेश मिळालेला असावा. * लाभाचे स्वरूप - 0 संस्थेचे आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क 0 क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी रु. १०,०००/-