काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शेतकऱ्यांबद्दल खरोखरच सहानुभूती असेल तर त्यांनी सूट-बुटातील आपल्या मेव्हण्यांना शेतकऱ्यांना जमीन परत देण्यास सांगावे, असा हल्ला भाजपने चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सूट-बुटातील सरकार असल्याचा हल्ला राहुल गांधी सातत्याने चढवत होते, त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी वरील प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना त्यांच्याकडे असलेल्या हरयाणातील जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यास राहुल गांधी यांनी सांगावे, असे वाजपेयी म्हणाले. राहुल गांधी यांनी जवळपास दोन महिने अज्ञातवासात घालविले आणि त्यानंतर तेलंगणमध्ये पदयात्रा काढली, त्यावरही वाजपेयी यांनी टीका केली.