रामपूरमधील वाल्मिकी वस्तीतील झोपडीधारकांनी डोक्यावर मुसलमानांची टोपी परिधान करून सांकेतिक धर्म परिवर्तन केल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मौलवींच्या अनुपस्थितीत या झोपडीधारकांनी सांकेतिक धर्म परिवर्तन केल्याचे सुत्रांकडून समजते. परंतु, केवळ आपली घरे वाचविण्यासाठी मुसलमानांची टोपी परिधान केल्याचे वस्तीतील लोकांचे म्हणणे आहे. कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन प्रशासनाकडून याआधीच झोपडीधारकांना देण्यात आले आहे. परंतु, अतिक्रमणाच्या भीतीने ग्रस्त असलेल्या झोपडीधारकांनी नगरपालिकेच्या कारवाईपासून आपल्या घरांना वाचविण्यासाठी मुसलमानांची टोपी परिधान करण्याचा मार्ग स्वीकारणे योग्य समजले आणि धर्म परिवर्तन केले.